" भावकीचा नाही , तर गावकीचा अन देशाचा विकास करायचा आहे " .....
दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आणि त्या निवडणुकांमध्ये आलेला आपल्याला प्रचंड भाव आणि ह्या भावामध्ये वाहून गेलेली अविचारी जनता आणि ह्या जनतेला पायाशी तुडवून स्वतःचे अस्तित्व उंचावणारे काही नेते , अशी काहीतरी दयनीय अवस्था सध्या आपल्या देशाची झालेली आहे . पक्षवाद , जातीयवाद , वर्णवाद ह्या गोष्टी आपल्या देशात इतक्या प्रचंड प्रमाणात वाढत आहेत जसे की , एखाद्या विकसित जागेचे भाव . याचे कारण फक्त आपणचं आहोत , जेव्हा एखादी निवडणूक जाहीर होते , त्यावेळेला पक्षातले , काही आपल्या भावकीतले , कुटुंबातले लोक ह्या निवडणुकांसाठी उभे राहतात आणि सुरुवात होते पक्षवादाची . निवडनुका ह्या फक्त जिंकायच्या आहेत एवढेचं नेत्यांची ध्येय असतात , पण जिंकल्यानंतर काय? याचा विचार कोणीच करत नाही आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये लोकांना दिलेली आश्वासने ही सारी फोल ठरतात . त्यामुळे हे त्रिवार सत्य आहे की , जगातील सर्वात कठीण काम कोणते असेल तर ते आपण दिलेल्या वचनावर ठाम असणे हे आहे . अर्थात ह्या आश्वासनांना जागण्यासाठी असणारी योग्य नीतिमत्त...