पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

" भावकीचा नाही , तर गावकीचा अन देशाचा विकास करायचा आहे " .....

इमेज
                    दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आणि त्या निवडणुकांमध्ये आलेला आपल्याला प्रचंड भाव आणि ह्या भावामध्ये वाहून गेलेली अविचारी जनता आणि ह्या जनतेला पायाशी तुडवून स्वतःचे अस्तित्व उंचावणारे काही नेते , अशी काहीतरी दयनीय अवस्था सध्या आपल्या देशाची झालेली आहे . पक्षवाद , जातीयवाद , वर्णवाद ह्या गोष्टी आपल्या देशात इतक्या प्रचंड प्रमाणात वाढत आहेत जसे की , एखाद्या विकसित जागेचे भाव . याचे कारण फक्त आपणचं आहोत , जेव्हा एखादी निवडणूक जाहीर होते , त्यावेळेला पक्षातले , काही आपल्या भावकीतले , कुटुंबातले लोक ह्या निवडणुकांसाठी उभे राहतात आणि सुरुवात होते पक्षवादाची . निवडनुका ह्या फक्त जिंकायच्या आहेत एवढेचं नेत्यांची ध्येय असतात , पण जिंकल्यानंतर काय? याचा विचार कोणीच करत नाही आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये लोकांना दिलेली आश्वासने ही सारी फोल ठरतात . त्यामुळे हे त्रिवार सत्य आहे की , जगातील सर्वात कठीण काम कोणते असेल तर ते आपण दिलेल्या वचनावर ठाम असणे हे आहे . अर्थात ह्या आश्वासनांना जागण्यासाठी असणारी योग्य नीतिमत्त...

भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....

इमेज
          आज देशामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आंदोलन चालू आहेत . ही आंदोलन शेतकी क्षेत्रांमध्ये होणाऱ्या खाजगीकरणाच्या विरोधात आहेत . आज देशातील अनेक क्षेत्रांमध्ये सरकार खाजगीकरण आणत चालले आहे . सरकारचे म्हणणे आहे की , खाजगीकरणामुळे देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये होणारे गुंतवणुकीचे प्रमाण वाढेल आणि त्याद्वारे त्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नवंतंत्राचा वापर होईल आणि त्याचबरोबर त्या क्षेत्राचा विकास देखील होईल . हो नक्कीचं भांडवलशाहीमुळे देशात असणाऱ्या विविध क्षेत्रातील लावले जाणारे पैशाचे प्रमाण हे नक्कीचं वाढेल आणि त्यातून त्या क्षेत्राचा काहीकाळ भपकेबाज विकास देखील होईल पण ह्या झालेल्या विकास कामांना वाली  तर काही ठराविक लोकचं असतील ना! असे लोक ज्यांना फक्त स्वफायदा महत्त्वाचा आहे आणि अशा लोकांमुळे , देशात नक्कीचं काही काळ विकास दिसेल पण पुढे हळूहळू ह्या खाजगीकरणाचे वाईट परिणाम देशाला एका युद्धाच्या मैदानात आणून सोडतील , असे युद्ध जे देशात तयार झालेल्या उच्च आणि कनिष्ठ या दोन वर्गांमध्ये लढले गेलेले असेल ज्यामुळे देशाचे फक्त आर्थिक नव्हे तर सांस्कृतिक , श...