पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वदेशी - एक देशवाचवा चळवळ

इमेज
              स्वदेशी ह्या शब्दावर आणि स्वदेशी चळवळीवर आज  सद्यस्थितीला पुन्हा विचार करण्याची गरज भासू लागली आहे , कारण आज आपण ज्या परिस्थितीत धसत चाललो आहे , ज्या दृष्टीने आपण विचार करत चाललो आहेत , ती परिस्थिती , ते विचार आपल्याला शेवटी नष्ट करणारे आहेत , आपल्या देशाचं या जगातला अस्तित्व मिटवणारे आहेत . आज आपण आपल्या सभोवताली असणाऱ्या आणि रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या बहुतेक गोष्टी ह्या विदेशी कंपनीच्या वापरत आहोत . दात घासण्यासाठी लागणाऱ्या टूथपेस्ट पासून ,                          आपण घालत असणाऱ्या कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट ही विदेशी कंपनीच्या बनावटीची आहे , आणि आपल्या देशातील लोकांनाही दुसऱ्या देशातील गोष्टी दिसल्या की अंगात वारं शिरतं असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही . त्यामुळे आज आपण  आर्थिक पारतंत्र्यात पूर्णपणे फसलो गेलो आहोत आणि त्यामुळे बाहेरच्या देशांचे अप्रत्यक्षपणे गुलामही आपण बनलेलो आहोत .             " स्वातंत्र्यलढ्याच्या ...

आजचा भारत ..... एक विदारक परिस्थिती ...

इमेज
                                    काल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आमचे नेते निवडून आले आणि कार्यकर्त्यांनीही जल्लोष केला , गुलाल , भंडारा उधळला . ज्यांचा पराभव झाला त्यांची कार्यकर्त्यांनी समजूत काढली , पुढच्या वेळेला नक्की येऊ असे म्हणून त्यांना धीर दिला . जे जिंकले त्यांनी मेजवान्या दिल्या ,  आमच्या कार्यकर्त्यांनीही त्या आनंदाने स्वीकारल्या अशा प्रकारचा आनंद साजरा करून आमचा पक्षाचा कार्यकर्ता घरी आला , दमून भागून आणि नाच-गाणं करून आल्यामुळे अर्थातच तो दमला आणि त्यामुळे तो झोपला पण दुर्दैव असं की झोपलेला कार्यकर्ता सकाळी झोपेतून उठला पण ह्या भारत देशाचा सुजान नागरिक तो काही झोपेतून उठला नाही तो झोपला तो झोपलाच .            आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ सत्तर वर्षे पूर्ण झाली तरीही ह्या देशाचा नागरिक हा झोपलेलाच . या नागरिकाला त्याचे देशाप्रती असणाऱ्या कर्तव्याची एक कवडीमात्रही जाण नाहीये , आपलं देशाप्रती असणारं सर्वात पह...

..... कडू पण सत्य - सत्यता आजची सत्यता भारताची......

            आज मितीला बाकीच्या देशांची आणि त्याचबरोबर भारतीयांची देखील विचार खुप खालच्या पातळीचे होत चालले आहे . बाहेरच्या देशांमध्ये आजमितीला नातेसंबंध ही बाब उरलीच नाहीये आणि ही बाहेरची गोष्ट हळू हळू भारतीयांमध्ये आधुनिकतेच्या नावाखाली रुजत चालली आहे . आज आपल्या हातामध्ये जगातील सर्वात ताकतवान गोष्ट आहे , ती म्हणजे मोबाईल आणि इंटरनेट , पण आज ह्या गोष्टीच्या मार्फत चांगल्या गोष्टी सोडून वाईट गोष्टी आणि वाईट विचार हे आमच्या मनात विरत चालले आहे .             भारतात एक जुनी परंपरा म्हणा किंवा संस्कृती होती म्हणा , ती म्हणजे आपली पत्नी सोडून बाकीच्या सर्व स्त्रियांना मातेसमान बघायचे पण आज मितिला भारतातील तरुण वर्ग प्रत्येक स्त्रीकडे वाईट नजरेने बघत आहे , पण आज थोड्याप्रमाणात नातेसंबंध टिकून आहेत म्हणून तरी बरे नाहीतर...... , पण लवकरच हे नातेसंबंध देखील नष्ट होतील  तेव्हा वाईटाचे सावट प्रत्येकाच्या मनावर राज्य करेल , हे वाचताना , ऐकताना तुम्हाला कडू वाटेल , पण हे सत्य आहे आणि हे प्रत्यक्षात येण्याचा काळ फार लांब नाहीये . ...

.....विचारशून्य मतदार आणि कर्तव्यहीन सरकार.....

                                    "निवडणूक"  निवडणुक ही फक्त आज स्वतःच्या स्वार्थासाठी लढवली जातेय असे वाटते. विकासाचे ढोंग आणून स्वतःची मालमत्ता कशी वाढवता येईल याचाच विचार प्रत्येक उमेदवार करतोय. मलाच मत द्या मी तुमच्यासाठी योग्य असा उमेदवार आहे असे निवडणुकीच्या वेळेस सांगितले जाते पण निवडणुका झाल्यावर आपला आणि त्यांचा संबंध तुटतो, तो तुटतोचं पुढील पाच वर्षांसाठी. आपला पक्ष कोणत्या धोरणावर स्थापन करण्यात आलेला आहे त्याची आश्वासन काय याच्यावर कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही आणि त्यातच आमचा मतदार देखील विचारशून्य बनत चाललेला आहे . हजार पाचशे दिले की दिवसभर त्या उमेदवाराच्या मागे, आमचे साहेब आमचे साहेब करत हिंडेल  पण निवडणुका झाल्यावर तेच साहेब हात वर करतील आणि त्यांनी दिलेल्या आश्‍वासनांचा दूरदूरपर्यंत संबंध येणार नाही याचा विचार करायला आजचा मतदार विसरतोय .आज मितिला अनेक पक्षाचं असे झाले आहे की, काही पक्ष...

.......आजची शिक्षणव्यवस्था आणि आमचे सरकार .......

                    "सरकार" ,  सरकार फक्त नावापुरतेच काम करते , भविष्याचा विचार करण्याची क्षमता कोणत्याही सरकारमध्ये नाही , किंबहुना भविष्य माहीत असूनही आज लोकांपुढे दिखावा करण्यासाठी आणि स्वतःची घरे भरण्यासाठी प्रत्येक सरकार काम करते ,  जे रस्ते पाच ते सात वर्षे टिकायला हवेत त्यांना एका महिन्यातच भेगा जातात ते धसतात, कसं काय ? आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ नुसती आश्वासन द्यायला सांगा या सरकारी लोकांना, पण सत्यात  मात्र कोणतेही कामं उतरत नाही. अरे शिष्यवृत्तीचे फॉर्म ऑनलाईन भरायचे हे सरकारने जाहीर केले पण त्यांना हे कोण सांगणार भारतातील किती लोकांना आजही इंटरनेट नीटपणे वापरता येत नाही. नुसता मोबाईल वरून फोन लावता आला आणि युट्युब ,इंस्टा , फेसबुक वर पिक्चर आणि फोटो पाहता आले म्हणजे कोणी इंटरनेटच्या दुनियेतला बादशाहा होत नाही. आज भारतात अमर्याद इंटरनेट वापरण्याची सेवा दिली आहे पण ते कसे वापरायचे याची अक्कल मात्र द्यायला आमचं सरकार विसरून गेलं. आणि ही अक्कल नसल्यामुळे आणि इंटरनेट बद्दलच्या असणाऱ्या अज्ञानामुळे कितीएक ...
                    .............मुक्त होताना.............             " मुक्त होताना " हे नाव मी मुद्दामहून दिले आहे , कारण हा प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्वाचा क्षण आहे . काहींसाठी तो खूप आनंददायी असतो , तर काहींसाठी जबाबदारीचे ओझे पडल्याप्रमाणे असतो . पण आजच्या पिढीला हा क्षण खूपच आनंददायी वाटतो आणि तो तितका असतोही पण , कधी कधी तो धोकादायक सुद्धा ठरू शकतो , जर योग्य वेळेला मुलांना योग्य गोष्टी लक्षात नाही आल्या तर .त्यामुळे योग्य वेळेला काही गोष्टी मुलांना सांगायला हव्या .          मुले प्राथमिक , माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असतात त्यावेळेला ती अनेक बंधनात बांधली गेलेली असतात , किंवा थोडक्यात धाकात असतात , तेव्हा अनेकदा त्यांना त्यांच्या मनाचे निर्णय घेता येत नाही . पण जेव्हा हे माध्यमिक शिक्षण पूर्ण होते आणि मुले त्यांच्या महाविद्यालयीन जीवनाला प्रारंभ करतात त्यावेळेस खरे त्यांना बंधनातून मुक्त झाल्याची जाणीव होते . " आणि ज्याप्रमाणे गोठ्यात बांधून ठेवलेल्या जनावरांना आपण ...