प्रत्येक अंगाचा विकास , म्हणजेचं सर्वांगीण विकास .....
ज्यावेळेला घरातील सर्वोच्च स्थानावर असणारी व्यक्ती तिचे कर्तव्य व्यवस्थित बजावतं नाही , त्यावेळेला जशी कुटुंबव्यवस्था ढासळते ना! तसेचं ज्यावेळेला एकमेकांच्या सहकार्यावर आधारितं असणाऱ्या ह्या समाजव्यवस्थेतील एखादा घटक , त्याचे कर्तव्य निस्वार्थीपणे आणि निष्ठेने जेव्हा बजावतं नाही ना! त्यावेळेला बाकीचा समाज गोंधळला जाऊन समाजात अराजकता माजली जाते आणि सामाजिक व्यवस्था ही ढासळली जाते आणि असा समाज सजीवमात्रांसाठी राहण्यास अयोग्य बनतो . आज मितिला ह्या जगामध्ये अराजकतेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना आपल्याला दिसतचं आहे कारण आज अनेकजण त्यांना दिलेली काम योग्यरीत्या आणि जनतेशी निष्ठा ठेऊन पार पाडण्यापेक्षा , आपण करतं असणाऱ्या कामाचा , आपल्या स्वार्थासाठी कसा जास्तीत जास्त वापर करून घेता येईल याचाचं विचार करतो आहे आणि ह्या समाजातील घटकांनी त्यांचे असणारे काम नीटं न केल्यामुळे , समाजातील बाकीच्या घटकांना त्यांचे आधिकार प्राप्त करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था हाती घ्यावी लागते आणि त्यातूनचं कधी हिंसाचार घडून देशाच्या संविधानिक व्यव...