योग्य शिक्षणातचं आहे देशाची खरी सुरक्षितता आणि प्रगती .....
काल एका १९ वर्षीय बलात्कार पीडितेची मृत्यूशी असणारी झुंज संपली आणि तिने आपल्या प्राणांचा त्याग केला आणि मग समाजातील सर्व स्तरांतून , बलात्कार करणाऱ्यांविरुद्ध रोष व्यक्त होऊ लागला त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी त्यांना फासावर देण्यात यावे अश्या अनेक लोकांच्या भावना व्यक्त होऊ लागल्या . महिलांवर होणारे अत्याचार यांबाबत अधिक कडक कायदे , केंद्रांनी नेमायला हवे जेणेकरून अशी अमानवी कृती पुन्हा करण्याची कोणाचीही हिम्मत होणार नाही , अशीही मते अनेक जणांनी मांडली . पण हे सर्व करतं असताना आपण एक गोष्ट विसरलो , ती म्हणजे ह्या आधीही आपल्या न्यायव्यवस्थेने दिल्ली सामूहिक बलात्कारातील आरोपींना फासावर दिले , फक्त एवढेच नाही तर हैदराबाद सामूहिक बलात्कारातील आरोपींचा एनकाउंटर देखील केलेला आहे आणि एवढे करूनही देशातील बलात्कार मात्र कमी होण्याचे नाव घेत नाहीये . कालचं आलेल्या एनसीआरबीच्या अहवालानुसार देशात दररोज ८८ बलात्कार प्रकरणे समोर येतात . गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये भारत देशामध्ये बत्तीस हजार तेहतीस ( ३२०३३ ) बलात्काराच्या घटना समोर आल्या आणि हो ह्या फक...