पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

इमेज
             आरक्षण , हा विषय सध्या प्रत्येकाच्या चहाचा विषय झालेला आहे , एखाद्याने चहाच्या सवडीला आरक्षणाचा विषय नाही घेणे म्हणजे नवलच म्हणावं लागेल . ज्यांना आरक्षण आहे ते अजून आरक्षण वाढवायचे कसे याचा विचार करतायेत तर ज्यांना आरक्षण नाही ते आरक्षण मिळवायचे कसे याचा विचार करतायेत . आज ह्या देशातील जवळजवळ सर्वच लोकांना फक्त स्वतःच्या दिखाऊ अन् तात्पुरत्या प्रगतीचे घेणे पडलेले आहे . आज देशातील कुणालाही स्वतःच्या हिमतीवर आणि बळावर ह्या देशाचा विकास करण्याचा प्रगती करण्याचा साधा विचार देखील मनात नाहीये . देशातील राजकारण्यांना सत्ता हवी तर देशातील जनतेला फक्त स्वतःचा भपकेबाज आणि न टिकणारा अपूर्ण विकास हवा आहे . जर खरचं ह्या देशातील जनतेला संविधानाच्या मूल्यांवर आधारित असणारा सामाजिक , राजकीय न्यायाच्या परिघात आणि समानतेच्या व संधीच्या शिखरावर असणारा खरा समाजवादी आणि राष्ट्रवादी देश हवा असेल ना! तर देशात असणाऱ्या ह्या आरक्षणाच्या बाबीला आज पूर्णपणे नष्ट करायला हवे . देशाचा खरा विकास करायचा असेल ना! तर या देशातील जनतेला प्रत्यक्ष स्पर्धेच्या तयारी मधील अपूर...