स्वावलंबन आणि स्वदेशी हीच काळाची गरज

           

                  आज मी जेव्हा एखादा विचार , एखादा शब्द लिहिण्यासाठी घेतो तेव्हा तो विचार , तो शब्द लिहिताना माझ्याकडून तो आपोआप इंग्रजी या भाषेमध्ये , इंग्रजी अक्षरामध्ये लिहिला जातो . आपल्या मराठी भाषेत तो शब्द पहिल्यांदा माझ्याकडून लिहिलाच जात नाही . इतक्या मोठ्या प्रमाणावर या विदेशी भाषेने माझ्या मनावर , माझ्या बुद्धीवर ताबा मिळवलेला आहे . आज बोलताना देखील मी अनेक शब्द इंग्रजीच वापरतो .


इतकेच नाही तर आजची म्हातारी  माणसे देखील इंग्रजी शब्द वापरतात . आज आपण बोलताना जवळजवळ अर्धे इंग्रजीत बोलतो . आज आपल्या आजूबाजूला अशा अनेक वस्तू आहेत , ज्यांना मराठीतून काय म्हणतात , त्यांच्यासाठी मराठीतून काय शब्द वापरतात हे आपल्याला माहितच नाही . उदाहरण द्यायचं झालं तर , टेबल , मोबाईल , आयडिया ही काही थोडेच शब्द झाले पण यांसारखे असे खूप शब्द आहेत , जे आजमितीला आपण वापरतो . इंग्रजीचे व्याकरण सोडले तर ,  इंग्रजी ही भाषा दररोज आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपण सर्रास पणे वापरतो . आज जेव्हा मी माझ्या आजूबाजूला बघतो तेव्हा मला सर्व काही इंग्रजीच दिसते .

             एखाद्या लाकडाला जशी वाळवी लागते ना! तशी ही विदेशी भाषा , ही विदेशी संस्कृती आपल्या भाषेला , आपल्या संस्कृतीला , आपल्या धर्माला लागलेली आहे . ही वाळवी जशी लाकूड पूर्णपणे नष्ट केल्यावर दुसऱ्या लाकडाच्या शोधात जाते ना! त्याचप्रमाणे ही विदेशी भाषा ,  संस्कृती आणि धर्म सुद्धा , आपल्या भाषेला , आपल्या संस्कृतीला आणि आपल्या धर्माला नष्ट करून दुसऱ्या गोष्टीच्या शोधात निघणार आहे .
             आणि दुसरं म्हणजे ही विदेशी भाषा संस्कृती धर्म हे परावलंबी बांडगुळ आहेत .

जे की दुसऱ्याच्या धर्मावर , दुसऱ्याच्या संस्कृतीवर आणि दुसऱ्याच्या भाषेवर अवलंबून असतात . त्यांना स्वतःची जोपासना स्वतः करताच येत नाही , म्हणजेच त्यांच्या भाषेत , धर्मात , संस्कृतीत कोणत्याही प्रकारचे ज्ञान नाहीये ते फक्त आणि फक्त दुसऱ्याचे ज्ञान , दुसऱ्याची संस्कृती व दुसऱ्याच्या गोष्टी चोरून बहूदा त्या करून स्वतःची संस्कृती , धर्म , भाषा महान बनवण्याचा प्रयत्न करत आहेत .
            ह्या विदेशी गोष्टी म्हणजे एक प्रकारचे हळूहळू काम करणारे विषच आहे .

जे की आपल्या भाषेमध्ये , आपल्या संस्कृतीमध्ये आणि आपल्या धर्मामध्ये फैलावत चालले आहे .
           जर आपण या विषावर आजच उपाय केला नाही ना! तर आपलं अस्तित्व लवकरच ह्या जगातून नष्ट होईल . आपल्याला आपलं स्वतःचं म्हणण्यासारखं काहीही राहायचं नाही आणि मग आपल्याला एका भुकेलेल्या कुत्र्याप्रमाणे या विदेशी लोकांकडे ,

त्यांच्या तोंडाकडे पहावे लागेल . आणि तोच अपमान ( भारतीय आणि कुत्र्यांना इथे येण्याची परवानगी नाहीये ) पुन्हा सहन करावा लागेल .
           आज ज्याप्रमाणे आपल्याकडे कच्चे तेल पेट्रोल-डिझेल उपलब्ध नसल्याकारणाने आपल्याला तेलासाठी अमेरिकेचा दबाव सहन करावा लागत आहे ना!

त्याच प्रमाणे भविष्यात आपल्याला आपल्याकडे आपली भाषा ,  आपली संस्कृती , धर्म आणि स्वदेशी गोष्टी नसल्याकारणाने दुसऱ्या देशांची मक्तेदारी पुन्हा सहन करावी लागेल .  आपल्यापैकीच काहींना माझे  बोलने पटेल तर काहींना ते पटणार नाही हे नक्कीच ! पण , एक गोष्ट प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवली पाहिजे , ती म्हणजे आपण भारतीय येणाऱ्या संकटाची वाट पाहत बसत नाही , तर ती संकटे येण्याच्या आधीच त्या संकटांना नष्ट करतो हा आपला इतिहास आहे . त्या संकटांना या देशात मुळे धरायच्या आताच त्यांना आपण नष्ट करतो . हे मी स्वतः म्हणतोय अशातला भाग नाहीये आणि हे माझे स्वतःचे वैयक्तिक मत आहे अशातलाही भाग नाहीये , तर आपल्या आयुर्वेदशास्त्र

या ग्रंथाची निर्मितीच या नियमावर आधारित आहे . त्यामुळे अजून काही वेगळं सांगावं असं याची मला तरी गरज भासत नाहीये . संकटे आल्यावर त्यातून पळायला ,  त्यातून पळवाट काढायला आपण काही विदेशी लोक नाहीहोत , तर आपण संकटांशी दोन हात करू त्यांना हरवणारे आपण भारतीय आहोत . म्हणून मी सांगतोय की आपल्यात विदेशी लोकांचं रक्त वाहत नाहीये तर आपणामध्ये स्वदेशी , भारतीय भूमीच्या शूर पुत्रांच रक्त सळसळत आहे आणि  म्हणून ही गोष्ट हसण्यावारी न घेता , येणार्‍या विदेशी संकटांपासून आपल्या धर्माचा , आपल्या भाषेचा , आपल्या स्वदेशी गोष्टींचा स्वीकार करून आपल्या भारत वर्षाला , आपल्या भारतभूमीला वाचवूया आणि पुन्हा एकदा एका निर्धाराने , एकतेच्या आणि स्वकीयांच्या आधारावर या देशाला उभं करूयात .....



                 वंदे मातरम ... जय हिंद ... जय भारत ...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....