सात्विक , सर्वांगीण विकास हाचं खरा विकास .....
आज जगभरामध्ये कोरोना नावाच्या एका मोठ्या संकटाने थैमान घातलेले आहे आणि दिवसेंदिवस ह्या संकटाची तीव्रता वाढतचं चाललेली आहे . आज बरेच जण असेही म्हणतं आहेत की , हा मनुष्यजातीचा शेवट आहे , हा जगाचा अंत आहे वगैरे वगैरे . पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे , हा आजार कितीही बळवला तरी देखील मनुष्यजातीला तो नष्ट करू शकणारं नाहीये पण हा , तो एक घाव मात्र नक्की घालून जाणार . म्हणून त्या घावाची तीव्रता कमी करण्यासाठी सर्व जगाने आणि जगातील सगळ्या नागरिकांनी एकत्रितरित्या प्रयत्न नक्कीचं व्हायला हवेतं . आज आपण ज्या युगात जगतं आहोत ते आहे कलियुग आणि ह्या चालू असणाऱ्या कलियुगाचे सद्या पहिले चरण चालू आहे आणि अजून लाखो वर्षे जायची आहे त्यानंतर ह्या धरतीवरची वाईट मनुष्य जात नष्ट होईल आणि चांगले मनुष्य शिल्लक राहून एका नवीन युगाला म्हणजेचं सतयुगाला सुरुवात होईल . आज जगभर जो कोरोना विषाणू थैमान घालत आहे ना! तो फक्त आपल्या मनुष्यजातीला निसर्गाकडून दिली गेलेली एक छोटीसी ठेचं आहे . ...