राजकारण , स्वतंत्र आणि देशाचे खरे वास्तव्य .....
आता आपल्या देशाच्या स्वायत्तेचा विचार करू . स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात आपण ब्रिटिशांविरुद्ध लढा देत होतो . विदेशी गोष्टीचा , वस्त्रांचा , शिक्षणाचा आपण त्याकाळात त्याग करत होतो का तर , आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य हवं होतं म्हणून ना! मग आज स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली तरीही , आजही आपण दुसऱ्या देशांचे , त्यांच्या भाषेचे , त्यांच्या शिक्षणाचे , संस्कृतीचे , सणांचे अप्रत्यक्षरीत्या गुलाम का आहोत . कारण आपल्याला परिपूर्ण स्वातंत्र्य हवं नव्हतं तर फक्त आपल्यावर राज्य करणारे विदेशी नको होते , म्हणून आजही आपण त्यांचे अप्रत्यक्षरीत्या गुलामचं आहोत .
अरे १९०६ सालच्या कोलकत्याच्या अधिवेशनात दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्याची चतु:सुत्री मांडली होती . त्यांनी स्वराज्य , स्वदेशी , बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे त्या चतुःसूत्रीचे महत्वाचे घटकं सांगितले होते . पण आज मितीला आम्ही यातील एकचं घटकं आमच्याकडे ठेवला आहे तो म्हणजे " स्वराज्य " पण ह्या स्वराज्याचा देखील आज अर्थ बदललेला आहे आणि तो " सत्ताराज्य " एवढाचं उरलेला आहे . उरलेले बाकीचे तिन्ही घटकं आम्ही आजही विदेशी लोकांच्या डोक्याप्रमाणे वापरतोय . आज आम्ही स्वदेशी गोष्टींपेक्षा विदेशी गोष्टींच जास्त प्रमाणात वापरतो आहे . आज संस्कृती , भाषा , पेहराव सर्वच गोष्टी विदेशी वापरायला आपल्या देशातील तरुण बघतात आणि बहिष्काराबाबत बोलायचे झाले तर आज आपण आपल्याचं स्वदेशी गोष्टींवरचं बहिष्कार टाकलेला आहे . आज देशातील राष्ट्रीय शिक्षणासंबधीत कार्यक्रमांत आपण प्रादेशिक भाषेंपेक्षा विदेशी इंग्रजी भाषेलाचं आधीक महत्व दिलेले आहे . म्हणजे आज इथे प्रत्यक्षपणे इंग्रज नसूनही , आपण आजही अप्रत्यक्षरीत्या त्यांचे काम पुढे चालवीतं आहोत , इतके अविचारी आपण आज झालेलो आहोत .
आज आपल्या देशातील नेत्यांचा फक्त सत्ता उपभोगणे एवढाचं उद्योग होऊन बसलेला आहे आणि देशातील लोकांचा परावलंबी बनण्याचा . हा देश ज्या गोष्टींमुळे विकसित होऊ शकतो , त्याचं विदेशी असल्यामुळे आपला देश दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे . आजच्या स्थितीला आपल्या देशातील नेते सत्ता मिळवण्यासाठी लढत आहेत तर , इथल्या तरुण वर्ग क्षणिक आनंद मिळवण्यासाठी . त्यामुळे आपला देश पुन्हा एकदा प्रत्यक्ष पारतंत्र्यात तर जाणार नाही ना! अशी भीती वाटते आहे? आज फक्त आपलं शरीरचं भारतीय आहे पण आपले विचार , भाषा , पेहराव सर्व गोष्टी विदेशी बनत चालल्या आहेत .आज मितीलां भारत जगातला सर्वात तरुण असणारा देश आहे पण आपलं दुर्दैव असं की , इतकी प्रचंड ताकद , बुद्धिमत्ता असूनही आपण आजही त्याचं देशांचे अप्रत्यक्ष गुलाम आहोत . जगातील सर्वात प्राचीन धर्म असणारा , सर्वात मोठा इतिहास असणारा , सर्वांत जास्त ज्ञान असणारा हा देश आजही दुसऱ्यांच्याचं आधारावर जगण्याचा प्रयत्न करतोयं . याचं कारण येथे स्वार्थाला आधीक महत्त्व दिले जात आहे , त्यामुळे पारतंत्र्याची घारीने आज आपल्या देशावर घिरट्या घालायला सुरुवात केलेली आहे आणि तिची सावली आपल्यावर पडायला देखील लागलेली आहे . म्हणून सावध व्हा आणि ह्या विदेशीच्या जाळ्यातून बाहेर पडून आपल्या देशाचा विकास करा .....
..... वंदे मातरम ..... जय हिंद ..... जय भारत .....




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा