तुमचे चांगले विचारचं बदलतील हा देश .....
आज सकाळी मी एक बातमी वाचली जी की बहुतेकांनी आपल्या मोबाईल स्टेटस ठेवली होती . ती बातमी होती हैदराबाद मधील एका युवतीवर बलात्कार झाल्याची ..... ह्या वाईट गोष्टीचा राग सगळ्यांनी आपल्या स्टेटसमधून पुरा व्यक्त केला . बहुतेकांनी तर शिव्यांपर्यंत मजल मारली . पण हे करताना ते सर्व विसरले की , कुठेतरी आपणही या अशाच प्रकारच्या खराब विचारांचा भाग आहोत भलेही ते कृतीत आणले नसतील ( कारण विचार करणे ही अर्धी कृती असते ) आज बहुतेक तरुण स्रीकडे आकर्षित होतात , त्यांच्या मनामध्ये स्री बघताच विषयं भावना उत्पन्न होतेच होते , मग आता तुम्हीच सांगा त्यां नराधामांमध्ये आणि आपल्या मध्ये फरक कसा काय? त्या नराधमांचा शिरच्छेद करायला हवा , त्यांना सार्वजनिक ठिकाणी फाशी द्यायला हवी , त्यांना जाळून टाकायला हवं असे विचार अनेकांनी मांडले पण , " झाडाची खराब झालेली फांदी छाटून काय उपयोग जर का , त्या झाडाची मुळेच विषात बुडालेली असतील . " त्यांना आज फ...