नागरिकत्व ( एनआरसी आणि कॅब ) कायदा योग्य की अयोग्य ? .....
आज देशभरामध्ये एनआरसी आणि कॅब या नागरिकत्व कायद्यामुळे जी अराजकता माजलेली आहे . आज जी मोठ्या प्रमाणावर आंदोलन आपल्या देशात चालू आहेत . ह्या चालू असणाऱ्या आंदोलनामधील बऱ्याच लोकांना या कायद्याबद्दल धूसर अशी देखील कल्पना नाहीये . हे लोकं फक्त आणि फक्त आपला समाज , आपल्या आजूबाजूचे लोक आंदोलन करतात म्हणून ते देखील करत आहेत . एका मेंढराच्या कळपाप्रमाणे ही आंदोलने आपल्या देशात आज सुरू आहेत . जी की , जंगलातल्या वनव्याप्रमाणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाढतचं चालली आहे . आंदोलन करणाऱ्यांना माझा विरोध नाहीये पण आधी कायदा काय आहे हे समजून घ्यायला हवं आणि मग आंदोलन करायला हवे . आपल्या देशात अशीही अनेक लोकं आहेत जी की , फक्त आणि फक्त दुसऱ्या समाजाविषयी , दुसऱ्या धर्माविषयी मनामध्ये असणाऱ्या विरोधी भावनेमुळे ह्या कायद्याला पाठिंबा किंवा विरोध करत आहेत . त्यांनीही संप्रदायाच्या दृष्टीने विचार न करता भारतीय म्हणून विचार करायला हवा या का...